बातम्या

देशात भाजपचेच सरकार येईल आणि भाजपला 200 जागा मिळतील- नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी  पंतप्रधानपदी विराजमान होतील की नाही, याबाबत शंका आहे. मात्र, देशात भाजपचेच सरकार येईल आणि भाजपला 200 जागा मिळतील. पण पंतप्रधान कोण होईल, हे सांगता येत नाही. असे असले तरीही मोदी पंतप्रधान व्हावेत ही अपेक्षा आहे, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील किमान 5 जागा लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच लोकसभेसाठी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंविरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय नारायण राणे यांनी जाहीर केला. 

स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यात लोकसभेच्या एकूण पाच जागा लढविणार आहे. अन्य उमेदवार नंतर जाहीर करण्यात येतील. ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना लढत आहे. तेथीलच हे उमेदवार असतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP will come To Power again in the country says Narayan Rane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT